अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदेच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा; कामोठे कॉलनी फोरमची मागणी

नवी मुंबई : सध्या महाराष्ट्रातील कायदा अणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा अणि पोलिस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे अणि उरण मधील यशश्री शिंदे अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या दोन्हीं घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा खराब करणाऱ्या आहेत. या दोन्हीं घटनेतील आरोपींनी अमानवी कृत्य केले असून अत्यंत घृणास्पदपणें अत्याचार करत अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदे यांची हत्या केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी अणि कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने कामोठे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील कायदा अणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी शासनस्तरावर कठोर पावले उचलावीत जेणेकरून अशा अमानवी निर्घृण कृत्यांना प्रतिबंध करता येईल. तसेच अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदे यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून अक्षता म्हात्रे अणि यशश्री यांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन आपण अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदेंच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
ह्यावेळी कॉलनी फोरम अध्यक्षा लीनाताई गरड, कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्षा जयश्री झा, सामजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर, सचिव बापू साळुंखे,आम आदमी पक्षाचे चिमाजी शिंदे, कॉलनी फोरमचे पदाधिकारी संदिप इथापे, देवानंद बाठे, सचिन खरात, संदिप लबदे, पंकज पोदुतवार, सुनील आडे,, मिलिंद बलखंडे, अजित चौकेकर, तुषार दळवी, अमित घुटुकडे गीता कुडाळकर, अर्पिता वाणी, श्वेतल भुसारी , उषाकिरण शिंगे, संजीवनी तोत्रे, प्रियांका साठ्ये, अपर्णा गावडे, हरिष बाब्रिया, अजित चौकेकर, अशोक मनवर, ह्यांच्यासह कामोठे शहरातली नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अक्षता म्हात्रे यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच काल उरण येथे यशश्री शिंदे यांची अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली. या दोन्हीं घटना बघता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सुरक्षित असल्याचे दिसून येत नाही. एकीकडे शासन महिलांच्या आर्थिक अणि सामाजिक बळकटीसाठी विविध योजना घोषित करत असताना महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ लक्षणीय आहे. सन २०२३ साली एकूण ७५२१ बलात्कारच्या गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रमध्ये झालेली आहे. आमची गृहमंत्र्यांना मागणी आहे की, महाराष्ट्रातील कायदा सुवस्थेचा आढावा घेऊन अशाप्रकारचे अमानवी अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत तसेच अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदे यांच्या हत्येचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवत, त्यांच्या गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी.”